Saturday, March 4, 2017

SAFAI


बार बार यू  हि साफ करत है  ।
मैल जुटाया दिन घडी छिनमे  ॥ १ ॥

सहा न जाये मैल जो देखे  ।
मनका मैल कोई आँख न देखे  ॥ २ ॥

मन चंगा तो सब कुछ गंगा ।
पैदा हुए सब समान नंगा  ॥ ३  ॥

खीँच खीँच तब दुनिया ढाके  ।
अपनाही तन  शर्मसे देखे  ॥ ४ ॥

कर ले शर्म दुनियासे भाई  ।
खुदकी छबि तो मनमे छाई  ॥ ५ ॥

भला बुरा सब समझे जाने  ।
आदतसे फिर मज़बूरी  माने ॥ ६ ॥

धोवत धोवत कपडा फटत है  ।
मजबूरीसे दिन कटत घटत है  ॥ ७ ॥

कर ले पूरा अब रोना धोना ।
जहाँसे आये  वही है जाना  ॥ ८ ॥





Wednesday, March 1, 2017

HOLD HAND O FATHER

हाथ धरो फिर तुम पिता हमारे ।
हम बालक कही छूट न जा रे ॥१ ॥

दिखाने लाये हो जगका मेला  ।
हँसाये रुलाये वो दिखानेवाला  ॥ २ ॥

एक पल आँखे न चाहे मिटना ।
क्या क्या देखे कुछ छूट न जाना  ॥ ३ ॥

चलत  रुकत दौड़त पग भागे ।
चाहत है देखन क्या आगे आगे ॥ ४ ॥

तेरे होते हमें बुलाये क्यों कोई शैतान  ।
बदनामी तो तेरी होगी हम तेरे संतान ॥ ६ ॥

बिना ढूंढते सामने आते बार बार ललचाते  ।
बुरा करते फिर पछताते ऐसा हम क्यों होते  ॥ ७ ॥

तेरा छोड़ू किसका पकड़ू भीड़ बड़ी दुनोयामे  ।
गायब हो कहा प्रभु  तुम आवत ना समझमें  ॥ ८ ॥

कान सुनत रहे कंठ गावत जहां हो तेरा सूर  ।
सुनीको अनसुनी कर दो जहाँ हुए बेसूर  ॥ ९ ॥

डर पावत है  खो जावत है बालक है हम तेरे ।
बार बार फिर हाथ पकड़ ले मालिक तुम हमारे  ॥ १० ॥












SOME CROP SOME DROP

काही पीक काही तण
काही लावले काही उगवले
काही वाढवले काही असेच वाढले
काही राखले काही तुडवले
काही आवडले का अवघडले ?
काही बिघडले का बिघडवले ?
काही आखीव रेखीव
काहींची सुसाट धाव
कुठे जाण्या निघालो
कुठे जाऊन पोचलो
कापणीत पीक गेले
तण मातीत राहिले
आज घेतले हातात
तेही जाणार मातीत
पुन्हा पीक पुन्हा तण
चाले अखंड नागवणं
भावार्थ
माणूस काही करायला जातो ते तसेच होते असा अनुभव नाही. तास नियमहि नाही. प्रसंग होता मिलिंदच्या आयोजित केलेल्या शहर रचनेच्या विषयावरच्या परिसंवादाचा. शहराचं उभे राहणे हि घराच्या / निवासाच्या मुलभूत गरजेचे स्वयंसिद्ध मुक्त प्रगटीकरण. त्यात राहती घरे अली, दुकानदारी आलो, कारखानदारी अली. पेठा गलिया वने उद्याने आली तशी स्मशानेंहि आली. मुळ वस्त्या पाणी आणि सुरक्षित राहणी एवढया तुटपुंज्या गरजेतून वसल्या. नियोजित शहर बसवणे अथवा वाढवणे हे नंतरचे . नियोजन करू त्या प्रमाणे शहरे वसत नाहीत हे सत्य जिकडे तिकडे उगवलेल्या झोपडपट्या ओरडून ओरडून सांगत असतात. सहज तुलना शेतीशी झाली आणि दोन्हीतील साम्य स्थळे दिसू लागली. शेतीत सुद्धा सर्व पीकच येत नाही तर नको असले तरी तण सुद्धा येतेच येते. अजुन पुढे विचार नेला आणि लक्षात आले कि जीवनाची पाऊलवाट सुद्धा अशीच आहे. सगळेच हवे ते देणारी नाही तर थोडे नको ते पण डोक्यावर घेऊनच मुक्कामाला पोचावे लागते. मृगळाप्रमाणे आले म्हणता म्हणता मुक्काम पुढेच जातो आणि पुन्हा पुन्हा नव्याने सुरवात करावी लागते . वर्षानुवर्षे असेच चालत आले आहि पुढेही असेच चालत राहणार जोपर्यंत जगाचे अस्तित्त्व आहे तोपयंत

CALL OF THE MIND

न हाकारी
मन हाकारीसे मना । काय पुसतोसी जना ।।
तुझे तुलाच ठाऊक । तुझा व्यापार घाऊक ।।१।।
तुझी देवाण घेवाण । कधी कण कधीं मण ।।
काही उधार उसने । चुकवावे लागे देणे ।।२।।
रिण घेऊनिया आला । रिण देऊनिया गेला ।
कधी होणार मोकळा । सोडवुनी गुंतावळा ।।३।।
का बघे ना अंतरीं । करी का दिवाळखोरी ।।
इथे चाले ना नादारी । तुझी जप्ती कोण करो ? ।। ४।।
तुच तुला बुडवावे । नको काही नको हवे ।।
जेथे संपली उपाधी । तेथे लागली समाधी ।।५।।
भावार्थ
मनाचे दोन भाग कल्पिले आहेत . एक सांगणारा . दुसरा ऐकणारा . ऐकणारा भाग खूप जणांचे खूप काही ऐकत असतो. सांगणारा भाग क्वचितच बोलत असतो . तो एकदा बोलू लागला कि आपला आपणाशी संवाद सुरु होतो. संवादात सांगणे , ऐकणे , मनन करणे , प्रतिप्रश्न करणे, युक्तिवाद करणे , फिरून चिंतन करणे आणि मान्य करणे हे सर्व आले . जेंव्हा असा संवाद चालू होतो तेंव्हा बाहेर कोणाला काही विचारावे अशी गरज उरत नाही. आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य गोष्टींची माहिती आपल्याला असतेच असते . ह्यालाच मनाचा घाऊक व्यापार म्हंटले आहे.
पुढील दोन कडव्यात व्यापाराच्या परिभाषेचा अवलंब करून मन हळु हळु स्वतःच्याच व्यापारात कसे गुंतत जाते ते सांगितले आहे. . वासनेचे ओझे घेऊन जन्माला यावे आणि मरावे लागते हे सुचित केले आहे. गुंतणे सोडवण्याची घाई केली आहे .
चौथ्या कडव्यात मनाला अंतर्मुख होऊन तुला कोणी बाहेरचा बुडवणारा नाही किंवा तारणारा नाही असे स्पष्ट केले आहे. इथे गुरूला नाकारणे अभिप्रेत नाही . " जो स्वयेंचि कष्टत गेला । तो नर भला रे भला " ( शिवानंदन केसरी ) , " गुरु की करनी गुरु ले जायेगा । चेलेकी करणी चेला ।। " ( कबीर ) आठवावेत .
शेवटच्या कडव्यात मनॊलयाचे महत्व प्रतिपादून रचनेची सांगता केली आहे.